आमच्याबद्दल

    कै. भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम संस्था हि अहमदनगर मधील एक विश्वसनीय वृद्धाश्रम संस्था आहे. ह्या वृद्धाश्रम संस्थेत वृद्ध व्यक्तींना धर्म, जात, पंथ, लिंग या पुढे जाऊन माणूस म्हणून सेवा दिली जाते. अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावरील ५ एकरपेक्षा जास्त जागेत हा वृद्धाश्रम सेवा देत आहे. समाजातील सर्व घटकांमधील अनाथ, निराधार, गरीब व गरजू वृद्धांना येथे प्रवेश दिला जातो. आश्रमात प्रवेश मिळविण्यासाठी पुरुषाचे वय ६० वर्षापेक्षा जास्त आणि स्त्रिचे वय ५५ वर्षापेक्षा जास्त असावे अशी अट आहे. सन 1964 मध्ये स्वर्गीय श्री. भाऊसाहेब फिरोदिया (माजी मुंबई विधानसभा अध्यक्ष) यांनी वृद्धाश्रमाची स्थापना केली. संस्थेच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ 1973 मध्ये वृद्धाश्रमाचे नाव बदलून भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम ठेवले गेले.

ध्येय

जात, धर्म, पंथ, लिंग हे सर्व बाजूला ठेवून ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याची सेकंद इनिंग सुखकर कशी होईल यासाठी अविरत प्रयत्न करणे

वारसा

    १९६४ साली भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रमाची स्थापना झाली. सावेडी येथील वसंत टेकडी येथे ५ एकर पेक्षा अधिक जागेत वृद्धाश्रम पसरलेला आहे. भाऊसाहेब फिरोदिया म्हणजे अहमदनगरमधील महत्वाचं नाव. मुंबई प्रांताचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि अहमदनगरचे राष्ट्रीय पुढारी म्हणजे भाऊसाहेब फिरोदिया. त्यांच्याच पुढाकाराने ह्या वृद्धाश्रमाची स्थापना झाली. नवीन व सुधारित इमारतीचे अनावरण ३१ ऑक्टोबर १९७३ रोजी ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय व सर्वोदयी कार्यकर्ते पूज्य श्री. दादा धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते झाले.

आमच्या सुविधा

भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम येथे खालील सुविधा पुरवल्या जातात

राहण्याची सोय

राहण्यासाठी उत्तम, स्वच्छ व सोयीयुक्त घरे/खोल्या.

आरोग्य सेवा

२४ तास मेडिकल/आरोग्य सेवा उपलब्ध.

सात्विक आहार

जेवणाची उत्तम सोय.

स्वच्छंदी परिसर

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यकरिता आल्हाददायक वातावरण

सुरक्षितता

सर्व सोयीसुविधांनी युक्त असे सुरक्षित वातावरण

आपत्कालीन सेवा

इमर्जन्सी साठी रुग्णवाहिकेची सोय.